satbara on whatsapp : सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात डिजिटल कामांना प्राधान्य दिले जात आहे. यातच राज्य कृषी विभाग देखील आता मागे राहिलेला नाही. याआधी देखील कृषी विभागाने विविध डिजिटल स्वरूपातील उपक्रम राबवलेले आहेत. ज्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र असेल किंवा एआय तंत्रज्ञान आधारित शेती असेल. परंतु आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि उपयुक्त असणारे कागदपत्र म्हणजे सातबारा आठ अ. आता हे कागदपत्र देखील शेतकऱ्यांना अगदी काही क्षणांमध्ये आपल्या मोबाईलवर व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवता येणार आहे. या प्रकारची सुविधा भूमी अभिलेख विभाग शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी दिलेली आहे. राज्यामध्ये येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून व्हाट्सअप च्या माध्यमातून सातबारा डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे अगदी काही क्षणातच आपण आपल्या व्हाट्सअपच्या माध्यमातून आपली सातबारा आणि आठ अ सहज मिळवू शकतो.
satbara on whatsapp शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सुविधा
भूमी अभिलेख विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोठे ही न जाता आपल्या मोबाईलवर सहज सातबारा आणि आठ अ (satbara 8 a) उपलब्ध होणार आहे. या कागदपत्रासाठी शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या आता या फेऱ्या बंद होणार आहेत. हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या वेळी शेतकरी आपली जमिनीची कागदपत्रे आपल्या मोबाईलवर व्हाट्सअप च्या माध्यमातून सहज मिळवू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि फसवणूक या सर्व गोष्टी पासून संरक्षण मिळणार आहे.
कधी सुरू होणार सुविधा
भूमी अभिलेख विभागांनी घेतलेल्या या निर्णयाचे अनेक शेतकऱ्यांकडून स्वागत केले जात आहे. शेतकऱ्यांना ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत देखील उत्सुकता लागलेली आहे. महसूल विभागाने येत्या 15 जुलैपासून ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर पुढे 01 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यभर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने कागदपत्रांचा पुरवठा शक्य होणार आहे.
या नवीन सुविधेमुळे शेतकऱ्यांना आता जमिनीची कागदपत्रे मिळवण्यासाठी सेवा केंद्रात किंवा तलाठी कार्यालयात रांगा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. आवश्यक त्यावेळी आपल्या शेतीसंबंधीची सातबारा, आठ अ, फेरफार आणि इतर नोंदी थेट whatsapp वर शेतकऱ्यांना मिळवता येणार आहेत.
शुल्क किती असणार
ही सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असताना अनेक शेतकऱ्यांचे मनात प्रश्न निर्माण झाला की यासाठी चार्ज किती (service charges) आकारला जाणार. या सुविधेसाठी शेतकऱ्यांना अधिकचा शुल्क भरावा लागेल का? तर असा कोणताही अधिकचा शुल्क शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ उताऱ्यासाठी 15 रुपये एवढा शुल्क आकारला जाईल. ही सातबारा आणि कागदपत्रे हे डिजिटल स्वरूपाची असतील ज्यामुळे त्यावर कोणाचेही शिक्का घेण्याची आवश्यकता देखील राहणार नाही.
सुरुवातीला यामध्ये नोंदणी करण्यासाठी 50 रुपये नोंदणी शुल्क आकारला जाईल. नोंदणी करतानाच जमीन मालकाचा पुरावा द्यावा लागेल. त्यासोबतच मोबाईल क्रमांक ओटीपी (otp) च्या माध्यमातून तपासला जाईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्याला हव्या असणाऱ्या वेळी व्हाट्सअप माध्यमातून शेतीसंबंधी आवश्यक असणारे डिजिटल कागदपत्रे (digital document) आपल्या मोबाईलवर सहज मिळू शकाल.
डिजिटल युगाचा योग्य वापर
भूमी अभिलेख विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्यच मानावा लागेल. अनेक कार्यालयामध्ये आणि सेतू केंद्रामध्ये शेतकऱ्यांची या कागदपत्रासाठी मोठ्या प्रमाणावर लूट केली जाते. भूमी अभिलेख विभागाच्या या सुविधेमुळे आता शेतकऱ्यांची लूट नक्कीच थांबणार आहे. डिजिटल युगाचा वावरताना देशाच्या अन्नदात्याचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या डिजिटल सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि त्रास तिन्ही गोष्टी बचत केल्या जाणार आहेत.
लवकरच ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल आणि 01ऑगस्टपासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ही सुविधा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे ठरणारी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ही सुविधा कधी सुरू होते याची देखील उस्तुकता लागलेली आहे. फक्त ही सुविधा सुरू करताना व भूमी अभिलेख (bhumi abhilekh) विभागाने विना अडथळा शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध होईल अशा पद्धतीने काम करणे आवश्यक आहे.