Ativrushti Anudan महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यभरात तब्बल ३६ लाख ११ हजार एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकार मदतीसाठी पुढे सरसावले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच हा अहवाल पूर्ण होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू केले जाईल.

